२०२१ ची जनगणनाही जातीनिहाय गरजेची

 

२०२१ ची जनगणनाही जातीनिहाय गरजेची


पंकजांनी गोपीनाथ मुंडेंचा व्हिडीओ ट्विट करून दिली आठवण



मुंबई: राज्यातील ओबीसी नेत्यांनी ओबीसी आरक्षणावर ठाम भूमिका मांडली आहे. भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सुद्धा ओबीसी समाजाची जनगणना करण्याची मागणी केली आहे.त्यांनी ट्विट करून यंदाची जनगणना ही जातीनिहाय करावी अशी मागणी केली आहे. ‘२०२१ ची जनगणनाही जातीनिहाय होणे गरजेचं आहे. गावा-गावातून होणारी मागणी ही दिल्लीपर्यंत पोहोचणार यात शंका नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.


आम्ही सुद्धा देशाचे आहोत, आमची सुद्धा गणना करा. ओबीसी जनगणना आवश्यक आणि अपरिहार्य आहे असे म्हणत आपल्या सरकारला गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणाची आठवण करून दिली आहे. दरम्यान, याआधी सुद्धा पंकजा मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून रोखठोक भूमिका मांडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ओबीसी समाजाची जनगणना करावी अशी मागणीच पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.


कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा ‘ओबीसींची स्वतंत्र जनगणना होऊन त्यांची एकवेळ संख्या काय आहे ते कळू द्या’ अशी मागणी केली आहे. आम्ही ओबीसींचे पहारेकरी असून जागते रहो आमचे काम आहे. आम्ही जालन्यात मोर्चा काढत असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.